धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच
धाराशिव रिपोर्टर
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 असे एकूण 49 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय उमेदवारी अर्ज विक्रीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 586 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा आणि कळंब या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पार पडणार आहेत. त्यामुळे जिल्हाभरात राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.धाराशिव जिल्हा परिषदेसाठी एकूण 55 सदस्य, तर पंचायत समितीसाठी 110 सदस्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे धाराशिव जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























